Top Recommended Stories

Navgrah Upay: आंघोळीच्या पाण्यात ही गोष्ट मिसळा, सर्व समस्या आणि कुंडलीतील दोष होतील दूर!

Navgrah Upay : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे दोष दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत. यापैकी काही उपाय (Navgrah Upay) अतिशय सोपे आहेत. आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्याने ग्रह दोष दूर होतो.

Published: June 26, 2022 7:58 PM IST

By India.com News Desk | Edited by Priya More

Rahu greedy planet he himself gets the karma done then punishes Rahu Astrology Rahu Mantra rahu upay
rahu ko kaise shant kiya jaye

Navgrah Upay: ज्योतिषशास्त्र (Jyotishshastra) भविष्यातील घडामोडींचे भाकीत करते. ज्योतिषशास्त्रातून आगामी संकटं कळतात आणि संकटे टाळण्याचे मार्ग सांगते जातात. वास्तविक कुंडलीतील ग्रह दोषांमुळे (planetary defects) अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी या ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागेल. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे दोष दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत. यापैकी काही उपाय (Navgrah Upay) अतिशय सोपे आहेत. आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्याने ग्रह दोष दूर होतो. कोणत्या ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात (Bath Water) काय मिसळावे ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…

ग्रह दोष दूर करण्याचा अतिशय सोपा उपाय –

सूर्य –

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत आहे, त्यांनी आंघोळीच्या पाण्यात लाल फुले, केशर, वेलची आणि गुलहठी टाकून स्नान करावे.

You may like to read

चंद्र –

ज्यांच्या कुंडलीत चंद्र दोष आहे त्यांनी अंघोळीच्या पाण्यात पांढरे चंदन, शुभ्र सुगंधी फुले, गुलाबपाणी टाकून स्नान करावे.

मंगळ –

मंगल दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात लाल चंदन, बेलाची साल किंवा गूळ मिसळून स्नान करावे.

बुध –

बुध ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्त होण्यासाठी जायफळ, मध आणि तांदूळ पाण्यात मिसळून स्नान करणे खूप फायदेशीर आहे.


बृहस्पति –

कुंडलीत देवगुरू बृहस्पति अशक्त असेल तर आंघोळीच्या पाण्यात पिवळी मोहरी, उंबर आणि चमेलीची फुले मिसळून स्नान करावे.

शुक्र –

शुक्रदोषापासून आराम मिळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल, वेलची आणि पांढरी फुले टाकून स्नान करावे.

शनि –

शनीच्या अशुभ प्रभावाने जीवन नष्ट होते. अशा स्थितीत शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ, बडीशेप, सुरमा किंवा धूप मिसळून स्नान करावे.

राहू –

राहु दोषही जीवनात अनेक समस्या घेऊन येतो. त्याचा वाईट परिणाम टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात कस्तुरी, धूप मिसळून आंघोळ करावी.

केतू –

केतू हा देखील छाया ग्रह आहे आणि त्याच्या अशुभ प्रभावाने अनेक संकटे येतात. हे टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात धूप लाल चंदन मिसळून आंघोळ करावी.

Also Read:

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.

?>