By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Papmochani Ekadashi 2022: पापमोचनी एकादशीच्या दिवशी नक्की वाचा ही प्रचलित कथा, सर्व पापांपासून मिळेल मुक्ती
Papmochani Ekadashi 2022: चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. यावेळी ही एकादशी सोमवारी 28 मार्च रोजी येत आहे. एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात असे हिंदू धर्मात मानले जाते.

Papmochani Ekadashi 2022: चैत्र महिन्यातील (Chaitra month) कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी (Papmochani Ekadashi) म्हणतात. यावेळी ही एकादशी सोमवारी 28 मार्च रोजी येत आहे. एकादशीचे व्रत (Ekadashi fast) केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात असे हिंदू धर्मात मानले जाते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची (Lord vishnu) विधिवत पूजा केल्याने भक्तांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि हे व्रत केल्याने (Papmochani Ekadashi Vrat) भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी देखील धार्मिक मान्यता (Religious beliefs) आहे. त्यामुळे पापमोचनी एकादशीशी संबंधित लोकप्रिय कथा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पापमोचनी एकादशीच्या दिवशी कोणती कथा (Papmochani Ekadashi vrat katha) वाचावी हे सांगणार आहोत.
पापमोचनी एकादशी व्रताची कथा (Papmochani Ekadashi vrat katha)
पौराणिक कथेनुसार एक सुंदर चैत्ररथ वन (Chaitrarath Van) होते. तिथे च्यवन ऋषींचा मुलगा मेधावी (Rishi Medhavi) तपश्चर्या करत होता. एके दिवशी एक अप्सरा त्या जंगलातून जात होती. त्या अप्सरेचे नाव मंजुघोष (Manjughosh) होते. अप्सरेने मेधवीला पाहताच ती त्याच्यावर मोहित झाली. अप्सरेला मेधावीला आकर्षित करायचे होते पण लाख प्रयत्न करूनही ती यशस्वी झाली. ती निराश झाली तेव्हा कामदेवाने अप्सरेचा हेतू समजून घेतला आणि तिला मदत केली. कामदेवाच्या मदतीने अप्सरेने मेधावीला तिच्याकडे आकर्षित केले. अप्सरेच्या या प्रयत्नांमुळे मेधावीला भगवान शंकराच्या तपश्चर्येचा विसर पडला. त्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा त्यांना त्यांची तपश्चर्या आठवली तेव्हा त्यांनी मंजुघोषाला पिशाचिनी होण्याचा शाप दिला. अप्सरेने खूप विनंती केल्यावर मेधावीने तिला पापमोचनी एकादशीच्या व्रताबद्दल सांगितले आणि जर तु हे व्रत नियमानुसार पाळले तर तुझी सर्व पापे नष्ट होतील असे सांगितले. त्यानंतर अप्सरेने सांगितल्याप्रमाणे पापमोचनी एकादशीचे व्रत करून पापांमधून मुक्ती मिळवली. इकके मेधावीही पापमोचनी एकादशीचे व्रत करून आपल्या पापांतून मुक्त झाले.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतकांवर आधारित आहे. india.com याची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी कृपया संबंधित विषयातील तज्ञाशी संपर्क साधावा.)
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या