By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts Cookies Policy.
Maharashtra Breaking: धक्कादायक! विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्न
Maharashtra Breaking: धक्कादायक! विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर तरुणीचा आत्महदहनाचा प्रयत्नMaharashtra Breaking: नागपूर येथे सुरू असलेलं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) या ना त्या मुद्द्यांवरून गाजत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर एका तरुणीने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
DOCTOR VERIFIEDMaharashtra Breaking: राज्यात महापुरुषांचा अपमान होतो आहे, वारकरी संप्रदायाचा अवमान होत आहे, अशा घोषणा देत एक तरुणीने नागपूर येथील विधानभवनासमोर (Maharashtra Winter Session) अंगावर रॉकेल घेवून आत्महदहनाचा (Self immolation) प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा जवानांच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला. कविता चव्हान (वय- 28, रा. सोलापूर) (Kavita Chavan)असं आत्महदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचं नाव आहे.
Trending Now
कविता चव्हान हिला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान होतो, वारकरी संप्रदायाचा अपमान होतो अशा घोषणा देत कविता विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पोहोचली होती. तरुणीला पुढील चौकशीसाठी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी आता तरी…
सध्या राज्यात सीमावादाच्या मुद्यांवरून रान पेटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी नेभळटपणा सोडावा. आपल्या विधानसभेत कर्नाटकच्या सरकार आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधाचा ठराव मांडावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावसह सर्व सीमांचे रक्षण करून महाराष्ट्र राज्याने तयार केलेल्या बेळगाव वादाचा निषेध करण्याचा ठराव, करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साप चावल्याप्रमाणे गप्प बसले आहेत, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे.
सरकारची बघ्याची भूमिका..
मराठी भाषिकांवर अन्याय होऊनही राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीने डोळे वटारल्यामुळे यांच्या तोंडातून शब्दही बाहेर निघत नाही आहे, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे. कर्नाटक राज्याच्या येणाऱ्या निवडणुकीतील भाजपचा विजय हा शिंदे – फडणवीस यांना जास्त महत्वाचा वाटत आहे असा खोचक प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.